राज्य

दामाजीतील पराभव पचवत आवताडे बंधूंनी जिद्दीने सुरू केला मंगळवेढा तालुक्यातील सर्वात मोठा साखर कारखाना !

पंढरपूर  – मागील तीन महिन्यापूर्वीच आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेला दामाजी सहकारी साखर कारखाना विरोधकांनी निवडणुकीत जिंकला. मात्र जिद्दीने आवताडे बंधू यांनी नंदूर येथील  फॅबटेक कारखाना घेत याचे नामकरण आवताडे शुगर्स केले असून हा या भागातील सर्वात मोठा कारखाना असून यात को जन व डिस्टिलरी असल्याने उपपदार्थ निर्मिती केली जावू शकते.
दामाजी कारखान्याच्या निवडणुकीत आमदार आवताडे यांना स्वपक्षीयांनीच आव्हानं दिले होते. यामुळे विरोधकांची मोठी सोय झाली व कारखाना आवताडे यांच्या ताब्यातून निसटला. मात्र यानंतर काहीच दिवसात त्यांनी आवताडे शुगर्स या नावाने आता तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी  कारखाना सुरू केला असून विक्रमी काळात याची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. याचा गळीत हंगाम आता सुरू होत आहे.
 आवताडे शुगर हा कारखाना शेतकर्‍यांच्या सहकार्यावर चालू हंगामात प्रतिदिन पाच हजार मे.टन ऊस गाळप करून हंगाम यशस्वी पध्दतीने पार पाडण्याचा निश्‍चय आम्ही केला असून जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी आपला संपूर्ण ऊस कारखान्यास घालून सहकार्य करावे, सर्व तोडणी ठेकेदार व कामगारांच्या सहकार्याने आम्ही हा गळीत हंगाम चांगल्या प्रकारे पार पाडणार असल्याचा विश्‍वास कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे यांनी व्यक्त केला.


आवताडे उद्योग समूहाने नुकताच खरेदी केलेल्या आवताडे शुगर अँड डिस्टलरीज या कारखान्याचा पहिला गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन सोहळा ऊस उत्पादक शेतकरी आण्णाप्पा काकणगी व विष्णुपंत आवताडे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उभयतांचे शुभहस्ते सत्यनारायण महापूजा करून बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात आले.
यावेळी कारखान्याचे चेअरमन संजय आवताडे, बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी शुगरचे माजी व्हा. चेअरमन अंबादास कुलकर्णी, पंचायत समिती माजी सभापती प्रदीप खांडेकर, सुधाकर मासाळ, माजी उपसभापती सुरेश ढोणे, कात्राळचे सरपंच विजय माने, भैय्या कळसे, सद्गुरू कारखान्याचे संचालक मोहन बागल, शांतीनाथ बागल, महेश चव्हाण, शेखर भोसले, दादा ढोले, आबासाहेब पाटील, लक्ष्मण जगताप, युवराज शिंदे, प्रहारचे समाधान हेंबाडे, राजीव बाबर, शिवयोग्याप्पा पुजारी, बटू पवार, बसू पाटील, पप्पू काकेकर, सचिन शिवशरण, सौ.स्मिता म्हमाणे यांचेसह माजी शिवसेना तालुका प्रमुख प्रा.येताळा भगत, सरोज काझी, प्रमोदकुमार म्हमाणे उपस्थित होते.
पुढे बोलताना आवताडे म्हणाले की , माझं बोलणं कमी व काम जास्त असतं कारखान्याला ऊस घालणारे सर्व शेतकरी कामगार यांचं समाधान होईल असे काम आम्ही करणार आहोत या कारखान्याची पाच हजार मे.टन गाळपाची क्षमता आहे. हा कारखाना आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली आवताडे उद्योग समूहाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून आपल्या ताब्यात घेतला आहे या कारखान्यात उपपदार्थ निर्मितीची सोय असून 65 के एलपीडी डिस्लिरीज व 32 मेगावॅट को-जन निर्मितीही होते. हा कारखाना सुरू झाल्याने सुमारे सातशे कामगारांना पुन्हा रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर 250 मोठ्या वाहनांचे करार झाले असून 200 डंपिंग ट्रॅक्टर व 200 बैलगाड्यांचेही करार केले असून सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. त्याच बरोबर आमदार समाधान आवताडे यांचे मार्गदर्शनाखाली कारखान्याचा सुमारे सहाशे एकर परिसर असल्याने कारखाना परिसरात तरुणांना आणखी रोजगाराच्या संधी निर्माण करणार असल्याचेही चेअरमन संजय आवताडे यांनी सांगितले.


कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे म्हणाले की, हा कारखाना आम्ही साडेचार ते पाच हजार मे टन प्रतिदिन क्षमतेने चालविणार आहे. त्याच बरोबर हा कारखाना सुरू झाल्याबरोबर दीड महिन्यानंतर को-जन वीजनिर्मिती सुरू होणार आहे त्याच बरोबर डिस्टलरीही सुरू होणार असून ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे यांनी सांगितले. यावेळी प्रा. येताळा भगत, भाजपचे जिल्हा संघटक शशिकांत चव्हाण, सोमनाथ आवताडे, जमदाडे सर यांनी मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कूर्मदास चटके, विनायक यादव, भारत निकम, बापू काकेकर, ऍड धनंजय जाधव, बिभीषण बेदरे, डॉ.ताणगावडे, गणेश गावकरे, विकास पुजारी, बापूसाहेब मेटकरी, तानाजी पाटील, रावसाहेब राजमाने, शिवाजी रणे, सचिन चौगुले, चनबसू येनपे, नंदू जाधव, सुहास पवार, सुभाष सरगर, बालाजी मेटकरी, प्रसाद सातपुते, समाधान घायाळ, अमोल माने, जकापा नरुटे, जगन्नाथ रेवे, धनंजय पवार, चंद्रकांत पडवळे, तानाजी डोके, विलास राठोड, भास्कर घायाळ, लक्ष्मण जाधव, आयुब शेख, दत्ता कोळेकर, गणेश पाटील, परमेश्‍वर येणपे, मोहन पवार, संभाजी फाळके, रघुनाथ उन्हाळे, रमेश पवार, संपत आठकळे, वसंत लेढ्वे, बबन रोंगे, दामोदर रेवे, मिन्हाज शेख, अजय सरवळे, श्रीकांत रोंगे, रणजीत पवार  आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासो कदम यांनी तर आभार राजेंद्र पोतदार यांनी मानले.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close