राज्य

श्री सिध्देश्‍वर कारखाना बंद पाडाल तर राज्यभर आंदोलन , लिंगायत समन्वय समितीचा इशारा

सोलापूर –  श्री सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यासाठी राजकीय दबाव व कटकारस्थान करण्याचा काहींचा प्रयत्न सुरू असून हा कारखाना हा सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी व कामगारांच्या जीवनाचा आधार आहे. आर्थिक जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत  असताना  सध्या सोलापूर विमानतळाचे कारण पुढे करून काहीजण आंदोलन करत आहेत. यातून  कारखाना बंद राहिला तर शेतकरी बांधवांच नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे, हे पाहता कारखाना बंद पाडाल तर लिंगायत समन्वय समिती राज्यभर आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांनी दिला आहे.
बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळाची जागा उपलब्ध असताना शहरी भागात असणार्‍या होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाचा का आग्रह धरला जात आहे हे समजण्या पलीकडे आहे, असे ते म्हणाले. विमानसेवेला आमचा कोणताही विरोध नाही. चिमणी न पाडता विमानसेवा करु शकतो हे समस्त सोलापूरकर जाणून आहे. सिध्देश्‍वर सहकारी साखर कारखान्याचा कारभार हा अत्यंत पारदर्शी असून, उच्च दर देणारा कारखाना म्हणून याची ओळख आहे. शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय घेणारा हा साखर कारखाना काही नेत्यांना पाहावत नाही. यामुळेच गाळप हंगाम बंद पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. त्यामुळे कामगार, शेतकरी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. गेल्या कित्येक वर्षापासून माजी चेअरमन धर्मराज काडादी यांच्या नेतृत्वाखाली कारखाना अत्यंत पारदर्शी कारभार करत आहे. हजारो शेतकर्‍यांचे भवितव्य ह्या कारखान्यावर अवलंबून आहे प्रशासनाने कारखाना बंद पाडला तर राज्यातला लिंगायत समाज रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपात आंदोलन करेल, असे राष्ट्रीय समन्वयक अ‍ॅड अविनाश भोसीकर यांनी पत्रकार परिषेदत सांगितले.
 यावेळी लिंगायत समन्वय समीतीचे राज्य महासचिव विजयकुमार हत्तुरे, शहर समन्वयक सकलेष बाभूळगांवकर, लिंगायत ऑफीसर फोरम सचिन पेठकर, बसव ब्रिगेड शहर अध्यक्ष अमित रोडगे, प्रा. शिवलिंग अचलेरे, सिध्दाराम कटारे, थोंडाप्पा तोरणगी, बसवराज चाकाई, अजिंक्य उप्पिन उपस्थित होते.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close