विशेष

यंदाही पर्जन्यराजाने दिली साथ , उजनीसह भीमा व नीरा खोर्‍यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा

पंढरपूर- मागील चार वर्षे सलग पावसाने साथ दिली असल्याने उजनीसह भीमा व नीरा खोर्‍यातील धरणं ही पावसाळा संपत असताना हाऊसफुल्ल भरलेली आहेत. यातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग ही करण्यात आले आहेत. अद्यापही परतीचा पाऊस हजेरी लावत आहे.
उजनी धरण 110 टक्के भरले आहे तर भीमा व नीरा खोर्‍यातील प्रकल्पही क्षमतेने भरलेले आहेत. नीरा खोर्‍यातील गुंजवणी, देवघर, भाटघर ,वीर तसेच नाझरे प्रकल्प हे शंभर टक्के भरलेले आहेत. या हंगामात वीरमधून नीरा नदीच्या पात्रात 40.93 टीएमसी पाणी सोडले गेले आहे. वास्तविक पाहता नीरा खोर्‍यातील चार धरणांची पाणी साठवण क्षमता ही 48 टीएमसी ची असताना वीर मधून 40 टीएमसी पाणी सोडले गेले आहे. आता पावसाळा संपताना येथील सर्व धरणं शंभर टक्के भरली असल्याने पुणे, सातारा व सोलापूर भागातील जी शेती या पाण्यावर अवलंबून आहे, त्यांचा प्रश्‍न मिटला आहे.
भीमा खोर्‍यातील प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी साठलेले आहे.  घोड उपखोर्‍यातील पिंपळगाव जोगे 93.55 तर माणिकडोह 91 टक्के भरले आहे. बाकी येडगाव, डिंभे, वडज, घोड व विसापूर ही धरणं शंभर टक्के भरली आहेत.
भीमा उपखोर्‍यातील कलमोडी, चासकमान, भामा आसखेडा, वडीवळे, आंध्रा हे प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत. मुळा मुठा उपखोर्‍यातील मुळशी 95.02 तर टेमघर 98 टक्के भरले असून उर्वरित पवना, कासारसाई, वरसगाव, पानशेत ,खडकवासला ही धरणं शंभर टक्के भरली आहेत.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close