राज्य

भीमा खोऱ्यात पावसाचा जोर, उजनीत आवक सुरू

पंढरपूर, दि.20– गेल्या तीन चार दिवसांपासून भीमा व निरा खोऱ्यासह घाटमाथ्यावर पर्जन्यराजा सक्रिय झाला असून सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणात आता पाण्याची आवक सुरू झाली आहे. दरम्यान पुढील चार ते पाच दिवस पाऊस असाच बरसत राहिल ,असा हवामान खात्याचा अंदाज आहे.


उजनी धरणात दौंडजवळून 13 हजार क्युसेकने पाणी मिसळत आहे. यात आणखी होर्इल. बुधवारी ही आवक 6 हजार 900 क्युसेक होती. यात गुरूवारी वाढ झाली आहे. तर घाटमाथ्यासह  भीमा खोऱ्यात व जलाशय परिसरात होत असलेल्या पावसाने उजनीत येणाऱ्या पाण्यात आणखी वाढ होवू शकते. दरम्यान हा प्रकल्प वजा 34.16 टक्के अशा स्थितीत आहे. मागील वर्षी याच तारखेला धरण उपयुक्त पातळीत वेगाने भरत होते. मात्र यंदा उन्हाळ्यात सलग पाणीपाळ्या दिल्या गेल्याने धरणाचा प्रवास लवकर मृतसाठ्यात सुरू झाला होता.
यातच जून महिन्यात पावसाने ओढ दिल्याने उजनी उशिरा भरण्यास सुरूवात झाली आहे. मागील चोवीस तासात घाट माथ्यावरील भीमाशंकर, लोणावळा, खंडाळा यासह विविध भागात दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस नोंदला गेला आहे. लोणावळा धरण भरत आले असून यातून कधीही पाणी विसर्ग सुरू होवू शकतो. यामुळे  इंद्रायणीतून भीमेत पाणी येवू शकते. याच बरोबर भीमा उपखोऱ्यातील आरळा नदीवरील कलमोडी प्रकल्प शंभर टक्के भरला असल्याने व तेथे पाऊस पडत असल्याने 2509 क्युसेकने पाणी सोडले जात आहे.
मागील चोवीस तासात भीमा खोऱ्यातील वडीवळे धरणावर 123 मि.मी., पवना 143, टेमघर 105, मुळशी 85, कलमोडी 47, भामा आसखेडा 25, कासारसार्इ 39, वरसगाव 55, पानशेत 56, खडकवासला 16 मि.मी.अशी पावसाची नोंद आहे. उजनीवर केवळ 2 मि.मी. पाऊस झाला आहे. दरम्यान भीमा खोऱ्यातील धरण सरासरी 38.59 टक्के भरली आहेत.
निरा खोऱ्यातही पावसाचा जोर असून आज गुंजवणी 72, देवघर 95, भाटघर 28 तर वीर प्रकल्पावर 10 मि.मी. पावसाची नोंद आहे.

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close