पंढरपूर : १९८२ मधील नगररचना योजनेत मोबदला न मिळालेल्या विस्थापितांना अर्ज करण्यास मुदत वाढ

पंढरपूर – १९८२ च्या नगररचना योजनेमध्ये बाधित झालेल्या मात्र मोबदला अथवा प्लाॅट न मिळालेल्या विस्थापितांना या संदर्भात अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली असून अशा विस्थापितांनी २६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी, सोलापूर यांनी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे 1 व 2 मे 2025 रोजी पंढरपूर शहरांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विकास आराखड्या बाबत बैठक आयोजित केली होती. यामध्ये सन १९८२ मध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये नगररचना योजना राबविण्यात आली होती, मात्र विस्थापित नगर येथे बाधित मालमत्ताधारक यांना प्लॉट मिळाले नाहीत. प्लॉटच्या खरेदी ही दिल्या नाहीत अथवा आर्थिक मोबदला मिळाला नाही ,अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. यास अनुसरून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपविभागीय अधिकारी, पंढरपूर यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहे.
नगररचना योजनेमध्ये ज्या बाधित मालमत्ताधारकांना लाभ मिळाला नाही, अशा मालमत्ताधारकांनी आवश्यक कागदपत्रासह अर्ज करणेस मुदत देण्यात आली होती. तथापि अजूनही कोणी विस्थापित अर्ज करावयाचे राहिले असतील तर त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्यासाठी संधी देऊन मुदत वाढविण्यात आलेली आहे. त्यांनी दि. २६/७/२०२५ पर्यंत मुख्याधिकारी पंढरपूर नगरपरिषद यांच्याकडे अर्ज सादर करावेत. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या विस्थापितांना अपुऱ्या कागदपत्राबाबत त्रुटीपत्र देण्यात आलेले आहे, त्यांनी त्रुटी पत्रानुसार आवश्यक कागदपत्रे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर यांच्याकडे सादर करावेत आहे ,आवाहन उपविभागीय अधिकारी सचिन इथापे यांनी केले आहे. जेणे करून आलेल्या अर्जावर योग्य ती कार्यवाही करता येईल




