विशेष

24 तासात उजनी 10 टक्के वधारली

धरण प्लस घ्या उंबरठ्यावर, पाऊस सुरूच

पंढरपूर – उजनीच्या पर्जनक्षेत्रात तसेच भीमा खोऱ्यामध्ये होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे दौंड जवळची आवक वाढली असून धरण आता वजा 4.73 टक्के अशा स्थितीमध्ये आले आहे लवकरच ते उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल. मागील 24 तासात दहा टक्के पाणी जलाशयात वाढले आहे.
मागील दोन दिवसापासून घाटमाथा व भीमा खोऱ्यात जोरदार पाऊस होत आहे. काल भीमाशंकर येथे 290 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर अन्य धरणांवर ही चांगला पाऊस नोंदला गेला आहे. उजनी धरणावर सोमवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 16 मिलिमीटर पावसाची नोंद होती. दरम्यान धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही वाढली असून ती 19 हजार 328 क्युसेक इतकी झाली आहे . धरणातला एकूण पाणीसाठा हा 61.12 टीएमसी इतका आहे तर धरण मृत पातळीतून उपयुक्त स्थितीत येण्यासाठी आणखी 2.54 टीएमसी पाण्याची गरज आहे.
धरणातून मुख्य कालव्यात सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. केवळ भीमा सीना जोड कालव्यात 160 क्युसेकने पाणी सोडले जात आहे मान्सूनपूर्व पावसामुळे उजनी धरण मागील चार दिवसात 18 टक्के वधारले आहे. धरण परिसरातही मागील आठवड्यापासून सतत पाऊस नोंदला जात आहे. यामुळे मे महिन्यात उजनी धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. हा प्रकल्प येत्या दोन दिवसात उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close