Uncategorized

भीमाकाठी आठ तास वीज पुरवठ्याची मागणी, फडणवीस सकारात्मक

पंढरपूर – उजनी धरणातून भीमा नदीकाठच्या योजनांकरीता पाणी सोडण्यात आले असून यामुळे नदीकाठी वीजपुरवठा खंडित केला जातो. हे पाहता विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी केली आहे याच त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
लोकसभा निवडणुकीत विठ्ठलचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी भाजप ची साथ दिली होती. त्यामुळे या सत्तेचा उपयोग जनतेच्या विकासासाठी आणि विठ्ठलच्या सभासदांसाठी करण्याबाबतची भूमिका घेत , शासन दरबारी विविध प्रश्न मांडण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पिण्याचे पाणी सोडून भीमा नदीकाठचा वीजपुरवठा किमान आठ तास करण्यात यावा. ही पहिलीच मागणी फडणवीस यांची भेट घेवून केली असता त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत.

मुंबई येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन, वरील मागणीचे निवेदन दिले. सध्या उन्हाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न झालेला आहे. शेतकरी अहोरात्र मेहनत करून पिके जगविण्याचा प्रयत्न करीत असून अशा तीव्र उन्हाळ्यामध्ये पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. सध्या भीमा नदीकाठचा वीज पुरवठा २ तासच असल्यामुळे पिकांना पाणी देताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे उभी पिके करपू लागली आहेत . भीमा नदीकाठच्या गावांमधील शेतकऱ्यांच्या पाइपलाइन या नदीपासून १५ ते २० हजार फूट अंतरावर असल्यामुळे कमी वेळेत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे जनावरांस पिण्यासाठी पाणी मिळत नाही. जर हा विद्युत पुरवठा २ तासाऐवजी ८ तास सुरू ठेवल्यास जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल, सदर वीज पुरवठ्याची वेळ वाढविण्याची वारंवार शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. यामुळे अभिजीत पाटील यांनी फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन पत्राद्वारे मागणी केली असता, त्यावर संबंधिताना आदेश देऊन लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे हा वीजपुरवठा मंगळवार पासून सुरू होणार आहे. यामुळे शेतकऱ्याची अडचण दूर होणार आहे.

यावर्षी पाऊस चांगला आहे.नदीत आलेले पाणी किमान २ महिने पुरेल पण लाईट नसेल तर पाणी असून काही फायदा शेतकर्‍याला होणार नाही. पाणी वाया जाईल व उभी पीके जळून जातील. त्यामुळे सध्या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना बळ देण्यासाठी आपण हि मागणी केली होती. याची दखल उपमुंख्यमंत्री देंवेद्र फडणवीस यांनी घेत पिण्याचे पाणी ठेऊन शेतीस लाईट सुरु करण्याच्या सूचना दिल्यामुळे शेतकऱ्यांना खुप मोठा दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली आहे.

Header
Tags

Related Articles

Back to top button
Close
Close