Uncategorized

बहुप्रतीक्षित निरा देवघर बंदिस्त पाइपलाइनची निविदा निघाली, २९ गावातील शेती भिजणार !

फलटण – अखेर निरा देवघर प्रकल्पातून फलटण व खंडाळा तालुक्यातील २९ गावांना बंदिस्त पाइपलाइन व्दारे पाणी देण्याचे काम करण्यासाठी ७७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे .

यानिमित्ताने फलटण तालुक्यातील जनतेच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार जयकुमार गोरे, कार्यकारणी सदस्य जयकुमार शिंदे, विधानसभा प्रमुख सचिन कांबळे पाटील , माजी पंचायत समिती सदस्य धनंजय साळुंखे पाटील, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर ,लतीफ तांबोळी, मनोज कांबळे पाटील उपस्थित होते .फलटण तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा नीरा देवधर प्रकल्प असून 40 वर्षे झाली या तालुक्याच्या पाणी प्रश्नावर अनेकदा राजकारण झाले आहे. निरा देवधर प्रकल्पाच्या ब्रांच कॅनॉलची निविदा प्रसिद्ध झाली हे काम १२०० एमएम व्यासाच्या सिमेंट काँक्रिट बंदिस्त पाइपलाइनद्वारे होणार आहे. या कालव्यामुळे खंडाळा तालुक्यातील ९ व फलटण २० तालुक्यातील गावांना पाणी मिळणार आहे .तसेच दर महिन्याला आवर्तन मिळणार असून या फलटण तालुक्यातील पाडेगाव, कोरेगाव शिंदे मळा ,तरडगाव, माळवाडी, कुसूर, रावडी खुर्द ,रावडी बुद्रुक ,डोंबाळवाडी, तडवळे, काळज, खामगाव, मुरूम, सुरवडी , निंभोरे ,भैलकटी ,वडजल ,चौधरवाडी गावातील शेतीला यांचा फायदा होईल तसेच उर्वरित गावाची लवकरच निविदा निघणार आहे .

माझ्या व तालुक्याच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण असून कै. हिंदूराव नाईक निंबाळकर यांनी या तालुक्याच्या दुष्काळ संपवण्यासाठी जे स्वप्न पाहिलं होतं ते आज पूर्ण होताना दिसत आहे . फलटण तालुक्यातील गावाना याचा लाभ होणार आहे . गेली अनेक वर्ष या तालुक्यातील सत्ताधारी नेत्यांनी यासाठी काहीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत. परंतु मी खासदार झाल्यानंतर या तालुक्याच्या अत्यंत जिव्हाळाचा विषय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून बैठका घेऊन यास मान्यता घेतली. व त्यास मान्यता घेऊन आज निविदा प्रसिद्ध झाली आहे . त्यामुळे या तालुक्यातील जनतेला पाणी कमी पडणार नाही. खासदार झाल्यानंतर या तालुक्यातील इंच ना इंच जमीन भिजवण्याचे जे स्वप्न मी पाहिलं होतं ते आज राज्य सरकारने पूर्ण केल्याचा आम्हाला आनंद होत आहे. या तालुक्यातील धोम बलकवडी चारमाही वरून आता तो बारा माही होणार तसेच या तालुक्यातील जनता फलटण तालुक्यात तीन कॅनॉल जाताना पाहाणार आहे . भविष्यातील नवीन तरुण पिढी ही रोजगारासाठी आता मुंबई, पुण्यामध्ये नोकरीला जाणार नाही व स्वतःचे शेतीबरोबरच व्यवसाय सुद्धा आता आपल्या तालुक्यामध्ये करताना दिसेल. त्यामुळे या तालुक्यातील हरितक्रांती बरोबरच आर्थिक क्रांती सुद्धा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही.यानंतर शेती बरोबर च युवकांचे हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर

Header
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close