Uncategorizedराज्य

एसटी कर्मचाऱ्यांच्या “संसाराच्या होळ्यांवर राजकीय पोळ्या ” भाजू नका : मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई – राजकीय पक्षांनी गरीब एसटी कर्मचाऱ्यांना चिथावणी देऊन, आंदोलनास भाग पाडून त्यांच्या संसाराच्या होळ्यांवर आपल्या राजकीय पोळ्या भाजू नयेत, माझी त्यांनाही कळकळीची विनंती आहे. ही वेळ राजकारणाची नाही हे लक्षात घ्यावे. तसेच कर्मचाऱ्यांनी शासनास सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की, एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मागण्या मान्य करून तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करीत आहे. उच्च न्यायालयासमोर देखील शासनाने आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय काय पाऊले उचलत आहोत ते सांगितले असून न्यायालयाचे देखील समाधान झाले आहे. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे आपल्या मागण्यांसंदर्भात पुढील तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरू केलं आहे.

अशा परिस्थितीत माझी आपणास हात जोडून विनंती आहे की, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. आधीच आपण सर्वच जण अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा अशी माझी पुन्हा एकदा नम्र विनंती आहे. असे आवाहन श्री. ठाकरे यांनी केले आहे.

Header

Related Articles

Back to top button
Close
Close